
जेवण केल्यानंतर अन्न जठरात जाते. पचनासाठी जठराकडे उर्जा जास्त वाहू लागते.
अशावेळी शरीराला खर्च होणारी उर्जा परत बाहेरून मिळवणे नैसर्गिक वाटते.
त्यामुळे थंडीचा संदेश त्वचेकडून पाठवला जातो जेणेकरून व्यक्ती थोडया उष्णतेकडे जाईल आणि उर्जा पूर्ववत होईल.

दुसरे कारण म्हणजे अशा उन्हात गेल्याने इतर लागणारे विटामिन मिळतात, शरीराची हालचाल झाल्याने पचन सुलभ होते.
पण त्यानंतर काही काळातच ही उर्जा शरीरात व्यवस्थापित करण्यासाठी स्थिरता आवश्यक होते. त्यामुळे झोप येते.
प्राणी पहा, दुपारचे खाऊन झाले की कसे उन्हात थोडावेळ झोप घेतात.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*