
ओठा मध्ये तेल उत्पादन करणाऱ्या ग्रंथी (oil production glands) नसतात.
हिवाळ्यामध्ये हवेत आर्द्रता कमी असल्याने ओठ सुकतात व सतत कोरडे होतात.
हा कोरडेपणा घालवण्यासाठी मग सतत ओठांवरून जीभ फिरवली जाते.
पण त्यामुळे ओठांमधील ओलावा अधिकच कमी होतो. आणि ओठ फाटतात.
यावर घरगुती व नैसर्गिक उपाय म्हणून तूप लावणं फायदेशीर ठरतं.
त्यामुळे ओठ सुकण्याची प्रक्रिया मंदावते व ओठांमधील ओलावा टिकून राहतो.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*